बेनाम सा ये दर्द  ठहर क्यों नहीं जाता, जो बीत गया है वो  गुज़र क्यों नहीं जाता?

सबकुछ तो है  क्या ढूंढती रहती हैं निगाहें क्या बात है मैं वक़्त पे  घर क्यों नहीं जाता?

हे फेमस प्रातिनिधिक उदाहरण  असले तरी आपण सर्वजण  आपल्या मनात कटू-गोड  भूतकाळ जिवंत ठेवूनच जगत  असतो ... नाही का?

मनात येत राहते - जे आयुष्यातून  एकदा संपून गेलेय ते एकदाचे  निघून का जात नाही ? का छळत रहाते आजही ? 

अभिमन्यु प्रमाणे  चक्रव्यूह असतो तो एक.

का होते असे?  आपलं मन भरकटत राहते.? ही जाणीव   मनातला  त्रासदायक भूतकाळ  का  विसरू देत नाही...?

ह्या प्रश्नाच्या वावटळीत आपलं मन भरकटत राहते.

कोणत्या  असतात अशा  भावना ? ज्या स्वतःबद्दल  राग,  शरम  निर्माण  करतात?

 स्वभाव चिडचिडा होणे,  पटकन राग येणे,  कारण नसताना रडू येणे,  आगतिक आणि असहाय वाटणे,

होऊन गेलेला भूतकाळ  आपण परत परत आजही जगत असतो..   तो कायम फार म्हणजे   फारच त्रासदायक असतो.

भूतकाळात असलेला राग, द्वेष,  तिरस्कार जो त्यावेळी निर्माण झाला होता,  पण  त्याला निवळू दिले  नाही .. 

त्यावेळी  नकारात्मक विचार,  भावना, अपमान,  शरम अनुभवलेले  असतात हे सर्व मनात आजही  तितक्याच तीव्रतेने  जिवंत ठेवत असतो..

का ?

त्यांचे परिणाम  मानसिक तर असतातच   पण त्याने  वर्तमानातील नातेसंबंध,  कुटुंब  ह्यावर ही दूरगामी  वाईट परिणाम होतात.

उपाय काय ?

मानसिक स्ट्रेस मुळे शारीरिक आरोग्यसुद्धा बिघडायला लागते ... काहीही मोठे कारण नसताना  अंगदुखी,  सांधेदुखी,  अर्धशिशी, डोकेदुखी  मागे  लागते...

उपाय काय ?

www.themindtalks.com

प्रत्येकाच्या आयुष्यात याची फार गरज आहे